Translate

Viral News BharatGPT : ChatGPT च्या धर्तीवर आता भारतामध्येही स्वदेशी Bharat GPT जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांची माहिती

Viral News BharatGPT : "ChatGPT'' च्या धर्तीवर ''Bharat GPT'' हा स्वदेशी जीपीटी प्लेंटफॉर्म आणि 'लार्ज लँग्वेज मॉडेल' तयार करण्यासाठी आयआयटी मुंबई शी "रिलायन्स जिओ'' भागीदारी करणार आहे अशी माहिती 'रिलायन्स जिओ' चे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी दिली.

Viral News : ChatGPT च्या धर्तीवर आता भारतामध्येही स्वदेशी "Bharat GPT" ( जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांची माहिती)


Viral News BharatGPT : ChatGPT च्या धर्तीवर आता भारतामध्येही स्वदेशी "Bharat GPT"

( जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांची माहिती)

'आयआयटी मुंबई' मधील तंत्रज्ञानाचा महोत्सव असलेला 'टेकफेस्ट' बधवारी सुरू झाला आहे. आकाश अंबानी यांनी भविष्यात तंत्रज्ञानावर आधारित योजनांची माहिती देताना स्वदेशी 'भारत जीपीटी'' हा प्लॅंटफॉर्म तयार करण्यासाठी 'आयआयटी मुंबई' ला साथ देणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. 'चॅंट जीपीटी' च्या धतीवर 'generative Artificial Intelligence' च्या तंत्रावर आधारित बहुभाषिक स्वदेशी मॉडेल तयार केले जाणार आहे. हे तंत्रज्ञान टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

हे जरूर वाचा:- Nilavanti Granth : जिसे पढ़ने पर मिलती है दौलत या मौत

आयआयटी मुंबईतील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील प्रा. गुणेश रामकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी पद्धतीचे 'जीपीटी' आणि 'लार्ज लँग्वेज मॉडेल'(एलएलएम) तंत्रज्ञान सरकारी खासगी भागीदारीवर (पीपीपी) विकसित केले जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभांगाबरोबर आयआयटी मद्रास, आयआयटी मंडी, आयआयटी हैद्राबाद, आयआयटी कानपूर, आयआयएम इंदूर, आयआयआयटी हैद्राबाद, भाषीनी संस्था आणि डीएआरपीजी यांच्यातील तज्जही योगदान देत आहेत. तसेच अन्य काही खासगी कंपन्याही सहभागी आहेत.

कंपनीकडून उत्पादित केल्या जाणान्या अन्य वस्तू आणि सेवामध्येही 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' चा (एआय) वापर कसा केला जाऊ शकेल, याचाही विचार सुरू आहे. तसेच एआय म्हणजे केवळ् आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसून यात सर्वसमावेशक हा अर्थ अपेक्षित आहे. यातून तंत्रज्ञान हे सर्वाना फायदेशीर ठरेल आणि उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असेही अंबानी यांनी नमूद केले.

"भारत जीपीटी'' च्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानामध्ये भारतीय संस्कृतीचे मिश्रण करण्याचा प्रयत्न आहे. भारताच्या वैभवशाली वारशाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मिश्रणातून सर्व आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये प्रोत्साहन देणारी एआय परिसंस्था निर्माण करण्याचा यामागे उ्देश आहे. तसेच जनरेटिक्ह एआयची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. यातून आर्थिक वाढीलाही चालना मिळेल असे प्रा. गणेश रामकृष्णन यानी नमूद केले. 'भारत जीपीटी'' च्या समूहाकडून बहुभाषिक आणि मल्टिमोडल अशा मूलभूत मॉडेलसचे विविध प्रकारचे Application तयार केले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून तळागाळात नवकल्पना साकारण्यासाठी स्वदेशी पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.


जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.